Wednesday, 29 June 2016

हितसंबंध गुंतले असल्याने भाजीपाला,फळे मुक्त बाजाराला विरोध होत आहे.


आजच्या सकाळ मधील बातमी प्रमाणे भाजीपाला, फळे नियमनमुक्तीच्या निर्णयावर महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. या निर्णयाला बाजार समित्यांमधील सहकारातील राजकीय नेते, माथाडी, व्यापारी संघटना आणि अडते आदी घटकांचा विरोध आहे. या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडणार आहे, आणि मुळात अंमलबजावणी होणार की नाही याबाबतची अनिश्चितता कायम आहे.
तत्त्वतः मान्यता असलेले केद्र/राज्य सरकारचे हे दुसरे प्रकरण. पहिल्यात जनुकीय बदल केलेली पिके आणि आता दुसऱ्या प्रकरणात बाजारपेठांचे शिथिलीकरण. त्यांना होणारा मध्यमवर्गीय उपभोक्ते आणि संघटीत व्यापारी, कामगार आणि हौशी NGO यांचा विरोध मोडून काढणे आवश्यक आहे. त्यासाठीची लढाई सोपी नाही. आता शेतकऱ्यांचा पुळका दाखवणारे किती मैदान गाजवतात ते जरा बघाच.

Tuesday, 28 June 2016

सरकारचे अजूनही तळ्यात-मळ्यात:समिती नेमली आहे.

एका बातमीत म्हटलंय, According to the minister, a cabinet sub-committee under his chairmanship has been set up to sort out the issues, clarify the doubts that the traders and mathadi labour unions at the APMC have in connection with the government proposal.



Wednesday, 22 June 2016

बाजार खुला करण्याच्या लढाईत शेतकऱ्यांच्या बाजूने सामील व्हा

शेतकऱ्यांचा प्रश्न कळकळीने मांडणाऱ्या सर्वांना विनंती की APMC तरतुदीमध्ये बदल करून आंशिक काअसेना बाजार खुला करण्याच्या लढाईत शेतकऱ्यांच्या बाजूने सामील व्हा.  APMC मधले व्यापारी, हमाल, राजकारणी, आणि त्यांचे पाठीराखे समाजवादी, डावे, सहकाराच्या नावाने लुटीत सामील असलेले- हे सगळे विरोधात आहेत. शेतकऱ्यांना खुली बाजारपेठ मिळवण्या साठी मोठा संघर्ष करावा लागेल असे दिसतेय. स्वातंत्र्याची बूज राखण्यासाठीच्या ह्या संघर्षात भूमिका घ्या. जे जे जमेल ते ते करा. सहजासहजी हे बाजाराचे स्वातंत्र्य मिळणार नाही हे लक्षात असू द्या.