Friday 29 April 2016

जीएम संबंधी काही महत्त्वाचे मुद्दे.


१. जीएम म्हणजे मोन्सांतो जसे कपाट म्हणजे गोदरेज, मोपेड म्हणजे लुना अशी भाषेतली वापराची पद्धत असते. (भारतात दुसरा कोण जीएम बनवतो?)
२. एकीकडे स्पर्धा होवू द्यायची नाही आणि दुसरीकडे मोनोपोली झालीम्हणून आरडओरड करायची हा दुटप्पीपणा झाला.
३. दुसरा कोणी उत्पादक बाजारात येवू द्यायला विरोध करणाऱ्या मंडळीनी मोन्संतोची मोनोपोली व्हायला मदतच केलीआहे. त्यानंतर त्यांच्या किंमतीची चर्चा वायफळ ठरते.
४. पेटंट संपलाआहे म्हणून किमती कमी करा म्हणणाऱ्या मंडळीने कधी SKF चे बेअरिंग लोखंडाच्या भावात मागितल्याचे दिसत नाही.
५. "पेटंट संपलाआहे" याचा अर्थ "आता ते तंत्रज्ञान कुणालाही व्यापारी हेतूने उत्पादनात वापरता येईल" असा होतो.

६. सरळ वाणात हायब्रीड विगर (hybrid vigour) नसतो. त्यामुळे हायब्रीड वाण सरळ वाणा पेक्षा ७० ते १०० टक्के अधिक उत्पादकता देते. ही गोष्ट शेतकरी सोडून इतर सर्वांना सांगावी लागते. त्यांनी हायब्रीड क्रांती केली म्हणूनच भारतात दोन वेळेस खाता येईल इतके अन्न पिकते हेही इतर सर्वांना च्या अनेक मित्रांना आणि सरकारला वाटते. बंगाल, ओरिसा, ऊपु राज्यासांगावे लागते.
७. टोपलीखाली कोंबडा असला की सूर्य उगवायचा थांबेल असे आजही आमच्या अनेक मित्रांना आणि सरकारला वाटते. बंगाल, ओरिसा, ऊपु राज्यात कीड न लागणारी वांगी मिळतात म्हणे. भारतात BT वांगी अशीच मागील दाराने येणार आहेत काय ?

No comments:

Post a Comment