Wednesday 4 January 2017

नीती बदलल्याशिवाय काळा पैसा व भ्रष्टाचार कमी होणार नाही


समाजवादी व मिश्र अर्थव्यवस्था राबवणाऱ्या सर्व देशांना काळा पैसा व भ्रष्टाचार या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकाराल्याखेरीज उद्योग उभेच राहू शकत नाहीत अशी स्थिती इथे नेहरूनीतीमुळे निर्माण झाली.
१९४७ ते १९९२ या काळातील भारताची अर्थव्यवस्था दाखवणारा हा वार्तापट.
आपण स्वातंत्र्यानंतर स्वीकारलेला आर्थिक-राजकीय धोरणांचा अपहारीहार्य परिणाम हेच भारतातील भ्रष्टाचाराचे मूळ आहे हे जगभरातील अर्थशास्त्रज्ञ तसेच आपले अनेक नेतेही मान्य करतात.

...corruption in modern India from a common man’s perspective is about paying bribes in everyday lives to work around the system and get some work done (approvals, sanctions etc) from Govt officers (Sarkari Babus). It is a well acknowledged fact that in India, even the most honest citizens & businessmen who want to follow rules, are sometimes forced to cough out money to sustain. Why is it rampant in India but not in other countries like US/UK/Singapore? In order to find out how this kind of corruption came into being in India, one has to go back by a few decades and understand the economic model adopted after independence. (गुरुप्रसाद यांचा एक लेख .Roots of corruption in modern India.)

आर्थिक खुलिकरणाचे अर्धवट काम पूर्ण केल्याशिवाय काळाबाजार, काळा पैसा, भ्रष्टाचार आटोक्यात येणार नाही. आणि राजकीय प्रक्रिया आगतिकपणे धनदांडगे लोक, घराणेशाही, समुहवाद, तुष्टीकरण यांना शरण गेल्याने लोकशाहीला निर्माण झालेला धोका दूर होणार नाही. 

मोदींनी हाती घेतलेले चलनविषयक काम सिद्धीस जाण्यासाठी काही मुलभूत धोरणात्मक बदल आवश्यक आहेत. लायसन परमिट इन्स्पेक्टर राज आणि सरकारी उद्योग संपवणे; रास्त कर प्रमाण, कर आकारणी, कर संकलन अशा सुधारणा त्वरेने हाती घेणे. या सोबत कायद्याचे राज्य प्रभावी करण्यासाठी  तत्पर पोलीसयंत्रणा , नागरिकांना भरवसा सुरक्षा देणारी न्याय व्यवस्था आणि भविष्याबद्दल आश्वस्त करणारी शिक्षण व्यवस्था उभी राहणे आवश्यक आहे. नसता नोटा बंदी साठी भारताने सोसलेली वाताहत वाया जाईल.

Sunday 1 January 2017

वतनदारांचा बीमोड करणारा शेतकऱ्यांचा राजा शिवाजी

'शेतकऱ्यांचा राजा शिवाजी' या शरद जोशी, अनिल गोटे आणि राजीव बसर्गेकर यांच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचे वर्णन बळीराजा नंतरचा दुसरा शेतकऱ्यांचा राजा असे केले आहे. त्यात विस्ताराने त्यांनी त्याकाळी महाराष्ट्रात शेतकऱ्यांची लूट वतनदार कसे करीत आणि हे वतनदार संपवल्याखेरीज शेतकऱ्यांना लुटणारी व्यवस्था संपणार नाही अशी महाराजांची भूमिका असल्याची मांडणी केली.



राज्य कुणाचेही असो, या वतनदार मंडळींनी आपापल्या इलाख्यात प्रचंड दहशत आणि लूट करून लुटीचा एक हिस्सा राजाकडे दिला की त्यांची पिढीजात वतनदारी शतकानूशतके चालू राहत असे. म्हणूनच राजाबद्दल इथे शेतकऱ्यांना कधी आपलेपणा वाटला नाही.शिवाजी महाराजांनी मात्र ही परिस्थिती बदलून टाकली. वतनदारी संपवली. म्हणूनच शेतकरी जीवावर उदार होऊन महाराजांसाठी आणि या राज्यासाठी लढले. पण ही अवस्था फार काळ टिकली नाही. या वतनदार मंडळींनी महाराजांच्या मृत्युनंतर लवकरच पुन्हा बस्तान बसवले.  शेतकऱ्यांची लूट पुन्हा सुरु झाली.


यशवंत थोरातांनी सकाळच्या १ जानेवारी च्या लेखात मोठ्या खुबीने हीच मांडणी केली आहे. शेती, शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था यात स्वारस्य असणाऱ्या सगळ्यांनी थोरातांचा '..तो बनाके छोडेंगे आशियाँ!'  हा लेख जरूर वाचावा.

प्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदरकर म्हणतात,
'...त्यांना (शिवाजी महाराजांना) आयुष्यभर ज्या वतनदारांविरुद्ध लढावे लागले, ती नुसती त्यांच्या धर्माची माणसे नव्हती, तर त्यांच्या सोयरसंबंधातील माणसे होती. घोरपडे, जाधव, िनबाळकर, सावंत, सुर्वे असे वतनदार नेहमीच त्यांच्या विरुद्ध राहिले. शिवाजी महाराजांच्या विरुद्ध त्यांच्याच धर्मातील वतनदार का राहिले? या प्रश्नाचे उत्तर आणि लक्षावधी जनतेने त्यांना ईश्वरी अवतार म्हणून का पाहिले, या प्रश्नाचे उत्तर एकच आहे.’

'रयतांना, कष्टकऱ्या शेतकऱ्यांना आणि ग्राम इलाख्यातील सामान्यांना जाच आणि भय होते, ते वतनदार, जहागीरदार, दरकदारांचे. अशा वतनदारांचा बीमोड करणारा राजा जसा भेटला, तसा त्यांच्या पोटातली भूक ओळखणारा, कष्टाला, श्रमाला स्वाभिमानाची जोड देणारा तारणहारही भेटला. संत तुकारामासारख्या कुणबीपणाचा अभिमान बाळगणाऱ्या संताने तत्कालीन दुष्काळाचे, शेतकऱ्यांच्या दैन्य स्थितीचे, त्याच्या अपार कष्टाचे, त्याच्या एकूणच शेतीविषयक अर्थशास्त्राचे वा वास्तविक निरूपण आपल्या अभंगांतून केलेले आहे. आणि या साऱ्या वस्तुस्थितीवर मात करणारा राजा भेटला, याचे समाधान संत तुकारामांनी व्यक्त केलेले आहे. शिवरायांनीही वेळोवेळी तुकोबारायावर निष्ठा व्यक्त केलेली आहे.महात्मा जोतिरावांनी म्हणून दोघांचेही कौतुक केलेले आहे. कुणब्यातील साधू तुकाराम, तर कुळवाडय़ांना भूषण असणारा राजा शिवाजी, मऱ्हाठीपणाची ही दोन प्रतीके महात्मा जोतिरावांनी ऊर्जास्थानी स्वीकारलेली होती.'

(भास्कर चंदनशिव. http://www.loksatta.com/daily/20090219/mav05.htm)

महाराजांच्या मृत्युनंतर लवकरच हे वतनदार पुन्हा प्रस्थापित झाले आणि शिवशाहीचे वैशिष्ठ्य संपले. शिवाजीच्या नावाने आजही गुंड, पुंड वतनदार, सुभेदार राजकारण करीत आहेत. हे वतनदार, सुभेदार लुटारू संपवूनच ग्रामीण भागात लोकशाही येणार आहे, या दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई अजून बाकी आहे.


स्वातंत्र्यानंतर वतनदारी संपली असली तरी शतकानुशतके सत्ता गाजवणारी मंडळी नव्या रुपात ग्रामीण व्यवस्थेच्या मानगुटीवर बसली आहे. पक्ष कोणताही असो, दिल्लीत, मुंबईत राजा कोणताही असो, गावोवाव, वेगवेगळ्या इलाख्यात हे सुभेदार तशीच पकड ठेवून आहेत. ते, त्यांचे वंशज, सोयरे, भाऊबंद यांचीच सत्ता चालू आहे.

शरद जोशींचे पुस्तक इथून मिळवता येईल.